Home Breaking News टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर दणक्यात आगमन

टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर दणक्यात आगमन

T-20 विश्व विजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह येथे क्रिकेटप्रेमी, चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. टीम इंडियाची मरीन ड्राईव्ह परिसरातूनच विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. आपल्या लाडक्या क्रिकेटस्टार्सची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. अशातच मोठ्या प्रतिक्षेनंतर टीम इंडियाचे खेळाडू मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. पण अद्याप टीम इंडियाच्या खेळाडूंची बाहेर पडण्याची प्रतिक्षा चाहत्यांना करावी लागत आहे.

थोड्याच वेळात रोहितसेना आपल्या लाडक्या वर्ल्ड कप ट्रॉफीसह मैदानावर एन्ट्री घेणार आहे. हा क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी असंख्य क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली आहे. गुजरातमधील डबलडेकर ओपन डेक बसमधून व्हिक्ट्री परेड काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीची सांगता वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत खास सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, नरीमन पॉईंट आणि वानखेडे परिसरात जमलेल्या क्रिकेटप्रेमींकडून हिटमॅनच्या नावाचीच घोषणा करण्यात येत आहे