Home जिल्हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस ०५ वर्ष कठोर...

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस ०५ वर्ष कठोर शिक्षा आणि दंड; चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल.

चंद्रपूर / ब्रह्मपुरी :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपी पतीला न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षे सक्तमजुरी आणि ५, हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे मा. श्री. पि. एम. गुप्ता यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.



दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १४:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी पत्नी आपले हॉस्पिटलचे काम आटोपून घरी परत येत असताना, स्वागत मंगल कार्यालयामागे आरोपी पतीने तिला घरी चालण्यास सांगितले. फिर्यादीने घरी जाण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आरोपीने सत्तूरने तिच्या डोक्यावर, हातावर व पायावर दोन-तीन वेळा वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी फिर्यादीच्या बयानारून व वैद्यकीय अहवालावरून पोलीस ठाणे ब्रह्मपुरी येथे तत्परतेने गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८/२०२३ कलम ३०७ भादंवि अन्वे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली होती. तपास अधिकारी यांनी सखोल तपास करून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल व परिस्थितिजन्य पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.



💥 न्यायालयाचा निकाल व शिक्षा 💥
सदर खटल्याची सुनावणी मा. श्री. पि. एम. गुप्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. श्री. सुधाकर डेगावार यांनी युक्तिवाद केला व साक्ष पुरावे सादर केले. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरून दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपीला कलम ३०७ भादंवि कायद्यान्वये ०५ वर्ष सक्त कारावास व ५,००० रुपये दंड, आणि दंड न भरल्यास १ महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.



💥 तपास आणि मार्गदर्शन अधिकारी 💥
तपास अधिकारी :- पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र प्रभाकर उपरे, पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी
सरकारी वकील :- ॲड. श्री. सुधाकर डेगावार
कोर्ट पैरवी अधिकारी :- पोलीस अमलदार प्रकाश शेंदरे, ब.नं. २२७, पोस्टे ब्रह्मपुरी
मार्गदर्शन :- ही यशस्वी कामगिरी मा. आयुष नोपाणी (पोलिसा अधीक्षक चंद्रपूर), मा. ईश्वर कातकडे (अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर) व उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनखाली पूर्ण करण्यात आली.