Home राजकारण राज्यात पाचव्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

राज्यात पाचव्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान

मुंबई, २० मे (हिं.स.) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे- ६.९२ टक्के
दिंडोरी- ६.४० टक्के
नाशिक – ६.४५ टक्के
पालघर- ७.९५ टक्के
भिवंडी- ४.८६ टक्के
कल्याण – ५.३९ टक्के
ठाणे – ५.६७ टक्के
मुंबई उत्तर – ६.१९ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – ६.८७ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – ६.८३ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – ६.०१ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- ७.७९ टक्के
मुंबई दक्षिण – ५.३४ टक्के